पालघर तालुक्यातील तारापुर
जवळील कुडण येथे एका सात वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिलवासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालघर तालुक्यातील तारापुर जवळील कुडण येथे आपल्या कुटुंबियासोबत राहणारा प्रेम जितेंद्र पाटील (७) हा मुलगा मंगळवारी पहाटे सात वाजता दाट धुके असताना आपल्या घरापासून जवळच असलेल्या किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी गेला असताना त्याच्यावर अचानक एका प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याचा डोक्याला आणि चेहन्याला चावा घेण्याच्या आणि ओरबडल्याच्या गंभीर जखमा झाल्या आहेत. बिबट्याने हल्ला केल्यानंतर मुलाने जोरात आरडाओरड केल्याने जवळचे
नागरीक धावून आले, तो पर्यंत दाट धुक्याचा फफायदा घेत तो प्राणी पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रेम पाटील या मुलाला उपचारासाठी सिलावासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालकांना प्रथम हा हल्ला कुत्रा किंवा अन्य वन्य प्राण्याने केल्याची शक्यता वाटल्याने त्याबाबत त्यांनी कोणाकडेही वाचता केली नाही. मात्र त्यादिवशी तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची पुष्टी मिळाल्यानंतर याबाबत वनविभागाला कळवण्यात आले. या लहान मुलावर झालेल्या जखमां चा अभ्यास करून हा हल्ला
बिबट्याने केला असल्याची शक्यता उपचार करणारे डॉक्टर व वनविभागाच्या अधिकान्यांनी व्यक्त केली आहे. बिबट्याने लहान मुलावर हल्ला केल्याची घटना समजल्यावर डहाणू वनविभाग, बोईसर वनपरीक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, डहाणूचे वन्यजीव बचाव पथकाचे स्वयंसेवक आणि तारापूर पोलिसांनी बिबट्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. चिंचणी व तारापूर परीसरात मागील चार-पाच महीन्यापासून बिबट्याचा वावर असून त्याने अनेक वेळा परीसरातील पाळीव कोंबड्या, कुत्रे, मांजरी आणि शेळ्या यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहे. मात्र लहान मुलावर हल्ला करण्याची : घटना प्रथमच घडली असून यामुळे परीसरातील लहान मुले आणि नागरीक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावण्याची मागणी होत आहे.